प्रस्तावना

श्री आऊबाई चरित्र

पुस्तकाचे नाव: श्री आऊबाई चरित्र

लेखक: श्री दासगणू महाराज

भारतवर्षातील अग्रेसर तर्कशास्त्रज्ञ व तत्वज्ञ न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद, एम्.ए.यांचा पुरस्कार

(१)

श्री आऊबाईसाहेब जतकर यांचे चरित्र ही एक अद्भुतरम्य नवलकथा आहे. दारिद्र्य व वैभव, यौवन व तपस्या, भोग व विराग, कर्म व संन्यास, शौर्य व शालीनता, श्रद्धा व प्रज्ञा - अशा अनेक विषम द्वंद्वाचा समन्वय या नवलकथेत उपलब्ध होतो. श्री दासगणूंच्या प्रसन्न शब्दशलाकेने निर्मिलेले श्री आऊबाईसाहेब हे पुरस्कृत शब्दचित्र तर इतके सहजसुगम, रंजक व उठावदार झाले आहे की, त्याचे रंगलालित्य कालाच्या कराल करालाही पुसवणार नाही! विशेषत: त्यांनी केलेले बाबाजीरावाच्या वाढदिवस-प्रसंगाचे वर्णन तर फारच बहारीचे आहे. कलम, तलवार, तराजू व सारंगी- ही चातुर्वण्याची प्रतीके व त्याचे गुणदोष श्री दासगणूंनी मार्मिकपणे वर्णिले आहेत. वाढदिवसाच्या समारंभाचा प्रसंग हे मात्र कवीच्या कल्पकतेचे बाळसेदार अपत्य आहे! श्री आऊसाहेबांच्या आयुष्यातील इतर सर्व घटना ऐतिहासिक असल्याविषयी प्रत्यक्ष प्रमाणे मिळतात.

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod
Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col.
Behind S. P. college Pune - 411030 

 

दूरध्वनी क्रमांक

+91 90227 10632

 
 
 

ई-मेल आयडी

Search