You are hereप्रकाशित साहित्य
प्रकाशित साहित्य
Love and grief
My late father-in-law wrote heart breaking poems when he experienced grief after death of his second wife. She was very young and beautiful. He felt shattered and spent quite some time in thinking about death. He has expressed very tender feelings for her in these poems and also freely have written about the pain and great loss he was feeling during that period.
I found them during my search for his manuscripts and was moved by his extraordinary soft feelings for his dead wife.
Spiritual Poems
महर्षी विनोदांनी त्यांच्या कॉलेजमधील कालामध्ये अनेक इंग्रजी कविता केल्या होत्या. त्यातील बर्याचशा कविता कॉलेजच्या मासिकामध्ये छापून आल्या होत्या. नंतर त्या मृणालिनी चट्टोपाध्याय (सरोजिनी नायडू यांची भगिनी) यांनी "श्यामा" या मासिकातून प्रसिद्ध केल्या होत्या. अशा विखुरलेल्या कविता मला अनेक जुन्या वह्यांमधून सापडल्या. त्या एकत्रित करून त्यात काही गुगलवरील चित्रे घालून आम्ही खुलवून त्याचा ब्लॉग २००८ मध्ये प्रसिध्द केला. या पुस्तिकेत त्यांचे संकलन केलेले आहे. त्याकाळचे इंग्रजी साहित्य तेही छोट्याशा कवितातून मुलायम शब्दांतून व्यक्त केलेले वाचताना मला अप्पांच्या कविमनाची थोडीशी कल्पना आली.
साधनासूत्रे
२० व्या शतकाच्या पूर्वाधात रोहिणी, माऊली, प्रसाद अशा तत्कालिन मासिकांचे प्रकाशक-संपादक महर्षींकडून नित्यनियमाने साधना-सूत्रे लिहवून घेऊन मासिकाच्या पहिल्या पानावर "आशीर्वाद" या अंतर्गत प्रकाशित करीत असत. विश्व-शांति-सचिव या नात्याने पृथ्वीपर्यटन करीत असताना महर्षी त्यांचे लेखन पत्राद्वारे पाठवीत असत. या ५०-६० साधनासूत्रांपैकी काही निवडक सूत्रे या पुस्तकात प्रकाशित केली गेली आहेत. त्यांच्या लेखनाला कै. श्री. तात्यासाहेब केळकर "घट्ट बासुंदी" म्हणत असत. परमार्थाच्या वाटेवर चालणार्या साधकाला यातील विचार निश्चितच दिशा दाखवतात.
अभंग-संहिता
तरुणपणापासूनच महर्षींना काव्य स्फुरत असे. ते मिळेल त्या चिठोर्यावर खरडत असत. त्यांचे कॉलेजमधील स्नेही हे त्यांच्या काव्याचे प्रथम वाचक व समीक्षक असत. अशा हजारो अभंगांचा संग्रह मला १९८२-३ मध्ये घरात सापडला. त्यातील काही अभंग महर्षींचे स्नेही कै. प्र.रा. दामले यांनी महर्षीच्या वृध्दत्वात प्रकाशित केले. तीच ही अभंग-संहिता. संहिता म्हणजे विषयानुसार केलेले संकलन. "अहम् ब्रह्मास्मि।", "अनंतता", "शुद्रता" इ. विषयावरील अभंग या पुस्तिकेत आहेत. हे अभंग ४-६ ओळींचे, गायला सोपे, अतिमधुर, वाचकाच्या मनाचा खोल ठाव घेणारे, जीभेवर सहज रेंगाळणारे असे आहेत. या अभंगांना कै. श्री. पु.ल.
धवलगिरी - इ-बुक
महर्षी विनोदांचं हे सर्वात गाजलेलं पुस्तक. अजूनही हे पुस्तक प्रिंटमध्ये आहे. कुठुनकुठून लोक येऊन अजूनही हे पुस्तक घेऊन जातात. महर्षींमधील साधक परमार्थाचा धवलगिरी कसा चढून गेला त्याचे प्रवासवर्णन यात आहे. इतर यात्रींना उपयुक्त होईल अशा पध्दतीने ग्रंथाची सर्व मांडणी केलेली आहे. सुमधुर प्रासादिक भाषा, डोळ्यांपुढे चित्र उभे राहील असे लिहिण्याची हातोटी हे या ग्रंथाचे वैशिष्ठ्य. प्रत्येकाला आपणही हा प्रवास करावा असं वाटेल असे हे पुस्तक. मी परमार्थाकडे खेचली गेले आणि मेडिकल प्रॅक्टिस करायची नाही असं ठरवलं ते हे पुस्तक वाचून. जीवनाला अर्थवत्ता प्रदान करायला उद्युक्त करणारा हा ग्रंथ.
कुंडलिनी जागृती - नाथप्रसाद - इ-बुक
१९८३ सालानंतर शांतिमंदिरमध्ये जुनी कागदपत्रे यांचा शोध घेत असताना एका लाकडी पेटीमध्ये काही जुने बिन आखलेले कागद मला सापडले. या कागदांवर पेन्सिलने लिहिलेले, वळणदार, सुस्पष्ट, सुंदर अक्षरांतील हजारो श्लोक मला दिसले. त्यात १९३८,३९,४०,४२,४५ या काळात महर्षि विनोद सरदार मेहेंदळयांना श्लोक सांगताना आलेल्या उत्कट अनुभवाचा संदर्भ मला सापडला. काही विशिष्ट दिवशी, विशिष्ट वेळी, पुण्यातील सरदार मेहेंदळेंच्या घरी महर्षि विनोद जात असत आणि अतीन्द्रिय अवस्थेमध्ये स्फुरलेल्या काव्यपंक्ती टिपून घ्यायला ते रावसाहेब मेहेंदळेंना सांगत असत. त्याचे विलक्षण वर्णन श्रीज्ञाननाथजी रानडेंनी कथन केले आहे.
सौंदर्यसिद्धी
सौंदर्याचा आत्मा समन्वयात आहे. विविधतेतले एकत्व प्रतीतीला आले की सौंदर्यनिष्पत्ती होते. सौंदर्य म्हणजे हेतूदर्शन. आकृतीतला शब्द, योजनेतला रंग, संगतीतला हेतू उमगला की सौंदर्याच्या दर्शनलहरी हेलावू लागतात.
सौंदर्याचे समदर्शन
‘नहिं मरुं निर्जलं दृष्ट्या पुनर्दूरात् प्रतीयमानं जलं आदातुम् पातुम् वा विवेकी गच्छति।’ - शंकरानंदी
हे मृगजळ आहे असे समजल्यावर विचारी मनुष्य ते घरी आणण्यास किंवा पिण्यास धाव घेणार नाही.
अनुभव
अनुभव शब्दाचा अर्थ, न्यायदर्शनात व निरुक्तिशास्त्रात बुद्धी असा सांगितला आहे.
स्वतंत्रता, सहतंत्रता, संस्कृती
लोकसमुदाय हे संस्कृतीचे अधिष्ठान आहे.
मानवी जीवनाच्या स्वभावसिद्ध सामुदायिक स्वरूपामुळे व्यक्तिमात्राच्या ठिकाणी विशिष्ट गुणांची अभिवृद्धी होणे नैसर्गिक, क्रमप्राप्त व अवश्य असते.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- …
- पुढचे पान ›
- शेवटचे पान »
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.