(मार्च - १९६५)
ध्यान-योग हे केवळ ईश्वर प्राप्तीचे साधन नसून व्यक्तित्व विकासाचीही ती एक उपयुक्त प्रक्रिया किंवा पद्धती आहे.
[ प्रवाचक - श्रीजगद्गुरू, केवल अवधूत न्यायरत्न विनोद. माऊली (१९५० आषाढी)]
----------------------------------
सर्वथैव योग्य परिस्थिती, उत्तेजक वातावरण, स्फूर्तीदायक स्थलकाल या गोष्टी प्रभा-तरल प्रतिभेच्या आविष्काराला आवश्यक असतात.
[पश्यन्ती (११)]
----------------------------
स्वत:च्या अनुभवाचे अवलोकन, पृथक्करण, संकलन व महत्त्व-मापन ही आत्म-विकासाची चतु:सूत्री आहे. आत्मविकासाच्या महा-मन्दिराचा हा चतुष्कोण आहे.
भारताचे राजकारण शांतिनिष्ठ, शांति-प्रचूर व शांति-प्रचारक आहे, हे सर्वमान्य सत्य आहे. पण शांति म्हणजे काय, याचा सूक्ष्म विचार करणे आवश्यक आहे.
शांतिच्या पोटांत स्वसंरक्षणासाठी युद्ध हे निश्चितपणे समाविष्ट आहे.
श्रीवात्सायनांनी तत्त्वज्ञानाची व्याख्या अशी केली आहे - मिथ्याज्ञान नव्हे ते तत्त्वज्ञान.
वस्तूंतले `ते-पण' म्हणजे तत्+त्व प्रकट करणारे ते तत्त्वज्ञान होय.
या तत्त्वज्ञानाचा उदय कसा होता?
[प्रवाचक - न्या. विनोद. रोहिणी दिवाळी अंक (१९६२), पश्यंती (२१)]
----------------------------------
''वैराग्याव्यतिरिक्त मानवी बुद्धीचा विकास शक्य असावा.``
हा एकच वर सैतानाने, नरकासुराने परमेश्वराजवळ मागितला, व मिळविला असावा.
आर्यांच्या वेदग्रंथांतले तत्त्वज्ञान स्फूर्तीनिष्ठ, काव्यमय व गूढगहन भाषेत अवतीर्ण झाले आहे. त्या तत्त्वज्ञानाचा प्रज्ञाप्रधान, सुस्पष्ट आविष्कार उपनिषद् ग्रंथांत उपलब्ध होतो.