You are hereअध:पतनापासून संरक्षण करते ते ‘पत्र’ / अध:पतनापासून संरक्षण करते ते ‘पत्र’

अध:पतनापासून संरक्षण करते ते ‘पत्र’


पत्रकारीता
(समतानंद गद्रे यांनी आज सायंकाळी अनाथ विद्यार्थीगृहाच्या पटांगणांत, मोठ्या थाटामाटाने श्री. अच्युतरावजींची पुण्यतिथी साजरी केली. अध्यक्ष महामहोपाध्याय पोतदार व प्रमुख वक्ते श्री. बाबुराव अत्रे यांनी अच्युतरावांच्या जीवनावर झगझगीत नव-नवीन प्रकाश झोत टाकले. स्वत: गद्रे हे अच्युतरावांचे एक-निष्ठ अनुयायी आहेत. त्यांच्या लिहीण्या-बोलण्यांत ‘अ-च्युता’ मैत्री वारंवार चमकते.
श्री. अत्रे हे तर अच्युतरावांपेक्षाही अधिक यशस्वितेने महाराष्ट्राची ‘अस्मिता’ जागृत ठेवीत आहेत. अच्युतरावांच्या लेखणीचे तीन विशेष-खोच, बोच आणि टोच हे, अत्रे वाङमयात शतगुणित शक्तींनी प्रकटले आहेत. श्री. अच्युतरावांची परंपरा अशीच अखंडीत रहाणार व अधिकाधिक संपन्न होणार यांत संशय नाही. श्री. अच्युतराचांचा व माझा पुष्कळ संबंध आला होता. त्यांच्या अष्टपैलू प्रतिभेला व महाराष्ट्रनिष्ठेला, ‘श्रुति बोध’ काढून त्यांनी केलेल्या वेद-सेवेला व मराठी मनाच्या मशागतीला आदरबुद्धीने मनांत आणून हे चिंतन संपवितो.)
‘पत्र’ या संस्कृत शब्दाचा मराठीत पान असा अर्थ आहे. उदा. तुलसी-‘पत्र’ म्हणजे तुळशीचे पान.
तृण-पर्णावर पावसाचे थेंब किंवा दवबिंदू पडले तरी ते एकदम जमिनीवर जात नाहीत, काही वेळ तरी, ते सांभाळले जातात. हे दृश्य पाहून एका प्राचीन द्रष्ट्याने ‘पत्र’ या शब्दाची अर्थपूर्ण व अभिनव निर्मिती केली.

‘पत्र’ शब्दाचा निरूक्तार्थ ‘पतनात् जायते इति पत्रम्।’

पतनापासून, अध:पतनापासून संरक्षण करते ते ‘पत्र’.

बहुतेक सर्व शब्दांची निर्मिती अत्यंत काव्यपूर्ण व अर्थपूर्ण असते. सर्व शब्द ही ‘किंचित् काव्ये’ आहेत.
प्रत्येक शब्दाची उत्पत्ती कशी झाली असावी, मूलार्थ कोणता, ऎतिहासीक व सामाजिक स्थित्यंतरामधून आज उपलब्ध असलेला अर्थ कसा निर्माण झाला. या सर्व गोष्टींचा विचार करताना अभ्यासकांची स-विकल्प समाधि लागते व त्याचे मन:कोश व विज्ञानमय कोश हे आनंदमय कोशांत विलीन होतात.
प्रत्येक शब्दांची निर्मिती ही कालिदासा सारख्यांच्या भव्य-दिव्य प्रतिभेशी तुल्यबल असणार्‍या प्रतिभेचा आविष्कार असतो.
कोणत्याही शब्दाच्या स्वरूपाचे व घटनेचे प्रदीर्घ मनन केल्यावर हा साक्षात्कार होतो. ‘पत्र’ हा शब्द किती काव्यमय व अर्थवाही, दिप्तीकारक व स्फूर्तीदायक आहे हे, त्याचा मूलार्थ, निरूक्तार्थ पाहिला की लक्षांत येते.
वृत्त-पत्र म्हणजे वृत्त, घटना, झालेल्या गोष्टी सांगणारे ‘पत्र’.

वृत्त किंवा बातमी लिहीताना या लेखकाने, व्यक्तीचे व समाजाचे पतनापासून सरंक्षण झाले पाहिजे ही जागृति ठेवायला हवी.
समाजाच्या नैतिक निष्ठा स्थिराविणे हे वृत्तपत्राचे आद्य कर्तव्य आहे.
नीतिमान व्यक्तीचे नेतृत्व घ्यावयास पात्र असते.
शब्द-शास्त्र दृष्ट्या, नीती व नेतृत्व हे दोनही शब्द एकार्थ-वाचक आहेत.
...

पुस्तकाचे चॅप्टर्स

संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------