सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवी । - ज्ञानेश्वरी: ४-५२
भगवान श्रीकृष्ण म्हणतात, “सुखाची गुढी उभारण्यासाठी, विश्वसु्खाचा ध्वज उभविण्यासाठी मी युगायु्गांचे ठायी अवतार घेतो, हे खरे, पण ही गुढी, हा ध्वज मी स्वत: उभारीत नाही. जे सज्जन असतील, त्यांच्याकडून मी हे तोरण उंचवितो. सीमेला पोंचलेला अ-धर्म मी नष्ट करतों. अनेक दोषांनी, प्रमादांनी व पापांनी काळवंडलेली कर्म-लिखितांची बाडेच्या बाडें मी नष्ट करतों.”